पुन्हा त्याच वाटेवर येऊंन थांबलो मी,
जिथे सुरु झाली मालिका त्या प्रवास वर्नानांची
सावलीत त्या वाटेतल्या झाडाच्या
लिहली काही अक्षरे जीवन अनुभवांची
कधी वारा, कधी पाऊस,
कधी गवत, तर कधी फ़क्त ऊस
खात प्रवास केला मी
कधी गारा आल्या धाऊन
हाती झेलल्या पावसात जाऊन
ओंजलित पिल्या मी
पुन्हा काळी ढगे साचली
अन्धारलेल्या सावल्यांची
ओंजलित पिल्या मी
पुन्हा काळी ढगे साचली
अन्धारलेल्या सावल्यांची
सावलीत त्या वाटेतल्या झाडाच्या
लिहली काही अक्षरे जीवन अनुभवांची
वाट बदलत नाही, नाही बदलत हे जग
पाऊले बदलतात या वाटेवर का मग?
भेटलो अनेकांना या जीवन प्रवासांमधून
शिकलो खूप काही त्यांच्या अनुभवातून
घेतली डोक्यावरती ती टोपली आठवणींची
जिथे सुरु झाली मालिका त्या प्रवास वर्नानांची

Comments
Post a Comment